🔹 याला म्हणतात संस्कार 🔹
लग्नानंतर माहेरी आलेल्या मुलीचे माहेरवाशीणपण आठवडाभर चालले. सगळा आठवडा तिला हवं ते करण्यात सरला.परत सासरी जातांना वडिलांनी तीला सुगंधी, दरवळणारा अगरबत्ती पुडा दिला व जेव्हा सकाळी पुजेला बसशील तेव्हा ही अगरबत्ती लाव बेटा, असं आठवणीने सांगितले.
आई म्हणाली असे अगरबत्ती देतं का कुणी, ती प्रथमच सासरी जाते आहे, काहीतरी मोठं द्यायला हवे होते.
तसं वडिलांनी खिशात हात घातला अन् असतील तेवढे पैसे तिच्या हातात दिले.
सासरी पोहचल्यावर सासुने सगळ्या वस्तु बघितल्या.आणि अगरबत्ती पुडा बघुन नाक मुरडले.
सकाळी मुलीने अगरबत्तीचा पुडा ऊघडला. आत एक चिठ्ठी होती.