महाराष्ट्र नागरी सेवा नियम

१) महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक ) नियम १ ९ ७ ९ ( १ जून २ ० १ ३ पर्यंत सुधारित) 

सेवा नियम


प्रोत्साहन भत्ता GR

आदिवासी विकास विभागाचा प्रोत्साहन भत्ता GR

शासन निर्णया साठी खालील लिंक वर क्लिक करा 

GR Link

एकस्तर वेतनश्रेणी

किरकोळ रजा - CL

किरकोळ रजा   Casual Leave


सी.एल रजा –  CL रजा Casual leave या शब्दांचे मराठी भाषांतर नैमितिक रजा किंवा किरकोळ रजा असे केले जाते. Casual म्हणजे निर्हेतुक (unintentional) अनपेक्षित (unexpected) अपघाती (accidental) असा  शिक्षक, अधिक्षक , अधिक्षिका व इतर  कर्मचार्याच्या आवाक्याबाहेर तसेच निकडीच्या वेळी काढावी लागणारी रजा असे या रजा प्रकारचे वर्णन करता येईल. मुख्याध्यापक एका शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त 12 दिवसाची नैमितिक रजा (CL) देतील. मात्र ही रजा साधारणपणे एका वेळी तीन दिवसांहून जास्त दिवस घेता येणार नाही. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच दहा दिवसा पर्यंत नैमितिक रजा (CL) वाढविता येईल. काही शाळांमध्ये अतिनिकडीच्या, अतिमहत्वाच्या वा आकस्मिक कामासाठीही काढलेली किरकोळ रजा नाकारून ती बिनपगारी (LWP- Leave without pay) करण्याचा  प्रकार आढळतो. रजेचा अर्ज नाही, रजा आधी मजुर करून घेतली नाही,  इत्यादी कारणावरून नैमितिक रजा(CL) बिनपगारी (LWP- Leave without pay) करणे हे कायदा नियमातील तरतुदीना सोडून होणार आहे. सेवाशर्ती नियम 16 (1)(2) व (4) यामधील सविस्तर तरतुदी एकत्रितरीत्या वाचल्यानंतर शिक्षक,  अधिक्षक , अधिक्षिका व इतर कर्मचारी अगर मुख्याध्यापक यांची किरकोळ रजा नामंजुर करणे, नाकारणे अथवा रद्द करणे याचा अधिकार मुख्याध्यापक व   मुख्याध्यापकच्या बाबतीत शाळ समिती किंवा व्यवस्थापनाकडे किंवा संस्था चालकांकडे कायदा नियमामध्ये कुठेच मिळालेला नाही. त्यामुळे नैमितिक रजा(CL) प्रसंगी अर्ज नसला तरीही नाकारता येणार नाही किंवा बिनपगारी (LWP) करता येणार नाही असा नियम सांगतो.

योगेश चौधरी


छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की सर्रकन अंगावर काटा उभा रहातो.
महाराष्ट्रातच नाही,भारत देशातच नाही तर संपुर्ण विश्वात अतुलनीय्,अद्वितीय्,अलौकीक असा दुसरा छत्रपती शिवाजी राजा सापडणे कठीण आहे.  संपूर्ण जगातल्या साहसी,पराक्रमी आणि सफल अशा राजांमध्ये शिवाजी महाराजांचा समावेश करावाच लागेल. अलेक्सांडर्, नेपोलियन बोनापार्ट्,ज्युलियस सीझर या सारख्या योद्ध्यांइतकेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व होते, नव्हे काही प्रमाणात यांच्यापेक्षा जास्तच महाराजांचे कर्तुत्व होते. कारण या राजांकडे तयार सैन्य,भुभाग होता.तर महाराजांना सर्व शुन्यातुन उभे करावयाचे होते. हे राजे आपल्या आयुष्यातील शेवटची निर्णायक लढाई हरले तसेच त्यांचा त्याच पराजीत अवस्थेत अंत झाला त्याचबरोबर त्यांच्या मृत्युनंतर त्यांचे साम्राज्य लोप पावले. पण महाराजांनंतर त्यांचे साम्राज्य टिकले आणि वाढलेही.
शिवाजी महाराज युगपुरुष होते. त्यांनी अनेक नव्या गोष्टी सुरु केल्या . देशातले पहीले 'खडे सैन्य' त्यांनी उभे केले. त्यांनी देशातल पहील नौदल उभ केल,जलदुर्ग उभारले. शिवरायांनी वतनदारी पध्दती बंद सैनिकांना,अधिकार्‍यांना पगार सुरु केले.शेतकर्‍यांच शोषण करणारी जमिनदारी पध्दत बंद करुन शेतकर्‍यांचा फायदा असणारी रयतवारी पध्दत आणली.
शिवाजी महाराज 'रयतेचा जाणता राजा' होते हे खरच.शिवराज्याभिषेकापुर्वी एक महीना आधी लिहिलेल्या एका पत्रातुन त्यांना रयतेची किती काळजी होती हे कळते. महाराज लिहितात,'कोण्ही कुणब्याचे येथील दाणे आणील्,कोण्ही भाकर्,कोण्ही गवत्,कोण्ही फाटे,कोण्ही भाजी,कोण्ही पाले.ऐसे करु लागलेत म्हणजे जे कुणबी घर धरुन जीवमात्र घेउन राहीले आहेत तेही जाउं लागतील.कितेक उपाशी मराया लागतील.म्हणजे ऐसे होईल की ,मोगल मुलकात आहे त्याहुन अधिक तळतळाट होईल.तेंव्हा रयतेची सारी बदनामी तुम्हावर येईल.हे तुम्ही बरे जाणोन बहुत यादी धरुन वर्तणुक करणे.कोण्ही....रयतेस काडीचा आजार द्यावयास गरज नाही.ज्याला जे पाहीजे,दाणा हो अगर गवत हो,अगर फाटे,भाजीपाले व वरकड विकाया येईल ते रास्त घ्यावे.बाजारात जावे रास विकत आणावे.कोण्हावरही जुलुम अगर कोण्हासी कलागती कराया गरज नाही...'यावरुनच शस्त्राच्या जोरावर सैन्य जनतेवर अत्याचार तर करणार नाही ना याची महाराजांना काळजी होती .वरील पत्राच्या उपदेशाच्या बरोबर विरुध्द वर्तन आजचे राजकारणी करतात. जनतेचा पैसा,साधनसामग्री आपलीच आहे या थाटात आजचे राजकारणी आहेत.इतकेच काय तर सामर्थ्याच्या बळावर मोक्याच्या ठीकाणी असलेल्या जमिनीही हे राजकारणी लोक बळकावतात. जनतेच्या भाजीच्या देठालाही हात लावु नका सांगणारे महाराज कुठे आणि जनतेच्या भाजीच्या देठाला सोडुन बाकी सर्वावर आपलाच हक्क आहे या थाटात वावरणारे आजचे नेते कुठे!पण आपल्या प्रत्येक सभेच्या सुरुवातीला महाराजांच्या प्रतिमेला हे लोक न चुकता हार घालतात !
एखाद्या भागातुन सैन्य जात असताना शेतापासुन दुरवरुन न्यावे कारण शेतांमधुन नेल्यास शेताची नासाडी होईल व तसे झाल्यास शेतकर्‍याने जगायचे कसे याचाही विचार महाराजांचा होता. राज्य उभारणीसाठी काय आवश्यक आहे याबाबत महाराजांचा खोलवर विचार होता.व्यापार राज्यासाठी खुप महत्वाचा आहे हे महाराज जाणुन होते.'साहुकार हे तो राज्याचे भुषण' असे महाराज म्हणत. आजच्या,२१व्या शतकाच्या जागतिकीकरणाच्या काळातही हे वाक्य फार महत्वाचे आहे.स्वातंत्र्योत्तर काळात जर आपल्या राज्यकर्त्यांना या वाक्याचा विसर पडला नसता तर आज कदाचित भारत हे विकसित राष्ट्र असते. आपल्या काळाच्या भरपुर पुढे पहाण्याची महाराजांची दुरदृष्टी हे महाराजांच्या यशाचे फार मोठे रहस्य आहे.महाराजांनी जलदुर्ग बांधले कारण व्यापाराच्या नावाखाली येणारे ब्रिटीश्,पौर्तुगिज्,फ्रेंच यांचा मुळ हेतु काय आहे हे महाराज जाणुन असावेत. आणि त्यांच्यावर जरब ठेवण्यासाठी महाराजांनी जलदुर्ग उभारले ,नौदल उभे केले.
महाराज धार्मिक होते पण अंधश्रध्दाळु नव्हते.महाराजांचा तुकाराम महाराज्,समर्थ रामदास्,मौनी बाबा व इतर अनेक संतमहात्म्यांशी संबंध आला.महाराजांनी त्यांना सढळ हस्ते मदत केली.महाराजांची तुळजाभवानीवरील निस्सिम भक्ती तर आपण जाणतोच.स्वराज्यनिर्मिती करण्याची शपथही महाराजांनी रायरेश्वराच्या साक्षीने घेतली. 'हे राज्य व्हावे ही तों श्रींचीच इच्छा आहे' असेही महाराज म्हणत.पण धार्मिक असुनही महाराज अंधश्रध्दाळु नव्हते.महाराजांनी सिंधुबंदीची प्रथा मोडुन काढली.ज्या काळात समुद्रात काही मिटर जाणही पाप होत त्या काळात महाराजांची जहाजं मस्कटपर्यंत जाउन पोहोचली होती.अजुन एक उदाहरण म्हणजे राजाराम हा महाराजांचा पुत्र पालथा जन्मला तेंव्हा महाराज म्हणाले होते 'मुलगा पालथा जन्मला,बहुत उत्तम.आता तो दिल्ली पालथी घालेल.'
युध्दनिती,कुटनितीमध्ये तर महाराजांचा हात पकडण त्या काळात कुणालाही शक्य नव्हत.एक परदेशी इतिहासकार म्हणतो 'कुटनितीमध्ये महाराजांच्या करंगळीत जितक होतं तितक औरंगजेबाच्या पुर्ण शरीरात नव्हत.'आदिलशहाच्या तावडीतुन शहाजी राजांच्या सुटकेसाठी केलेले राजकारण्,जयसिंघाशी झालेल्या तहानंतर एकाच किल्ल्याला विविध नावे देउन २१ ऐवजी प्रत्यक्षात १७च किल्ले देण्याचे राजकारण्,अफजलखानाला मैदानी प्रदेश सोडुन दुर्गम्,जंगली,पर्वती प्रदेशात आणन्यासाठी केलेली कुटनिती,आग्र्याहुन सुटका करवुन घेण्यासाठी आजारी पडण्याचे केलेले नाटक्,औरंगजेबाने जिझिया कर लागु केल्यावर 'तुमच्यावर इतके दारीद्र्य आले आहे का?' असे म्हणुन त्याला हिणवण्यासाठी लिहिलेले पत्र ही महाराजांच्या कुशल बुध्दिमत्तेची ओळख करुन देणारी काही उदाहरणे! महाराजांना स्वभाषेचा अभिमान होता.म्हणुन त्यांनी रघुनाथ पंडीतांकरवी 'राज्यव्यवहारकोषा'ची निर्मिती केली.अरबी,फारसी भाषेच्या गुलामगिरीतुन मराठी भाषेची सुटका करण्यासाठी महाराजांनी तसे केले.पण आजही इंग्रजी,हिंदी भाषेच्या आक्रमणातुन आपली भाषा वाचेल का नाही याची आपल्याला चिंता वाटते.
शिवाजी महाराजांची रहाणी साधी होती पण विचारसरणी उच्च होती.स्त्रीयांचा,परधर्माचा,परधर्मग्रंथाचा,परधर्मस्थळांचा आदर ही त्याचीच उदाहरणे. पण त्याचबरोबर स्वधर्म्,स्वजन्,स्वभाषा यांच्याबद्दल सार्थ अभिमानही त्यांना होता.आपल्या धर्माच्या लोकांचे ,आपल्या रयतेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी महाराजांनी केल्या.छत्रसालच्या राजाला त्यांनी त्याच हेतुने मदत केली,त्याचबरोबर गोव्यामधे सक्तीने धर्मांतर करवणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रसारकांनाही महाराजांनी खंबीरपणे रोखले.
आजही सुरक्षादलांनी महाराजांकडुन खुप काही शिकण्यासारखे आहे.महाराजांनी स्वतःची ताकद ओळखुन 'गनिमी काव्या'चा योग्य वापर करुन साम्राज्य उभारले.भावनेच्या भरात जाउन आमने-सामने युध्द न करता शत्रु बेसावध असताना त्याच्यावर छापा टाकुन शत्रूची दाणादाण उडवण्याचे तंत्र अवलंबले.महाराजांचे हेरखाते अतिशय सक्षम होते.आजच्या आपल्या देशात हेरखाते अस्तित्वात आहे का नाही असा प्रश्न कधीकधी उभा रहातो.आपन आपल्या शत्रुला बेसावध कधीच गाठु शकत नाही उलट शत्रुच आपल्याला बेसावध गाठुन वेचुन वेचुन मारतो हे दंतेवाडा,२६/११ वरुन दिसुन येते.शिवाजी महाराजांचे आपल्या शत्रुवर नेहमी लक्ष असायचे. गाफील रहाणे तिथे चालत नसे.म्हणुनच शिवाजी महाराज एकाच वेळी विविध आघाड्यांवर लढत मुघल,आदिलशाही,ब्रिटीश्,पौर्तुगिज इत्यादींशी महाराज एकाच वेळी सामना करत.पण आजच्या परीस्थितीत भारत याबाबत कमालीचा गाफील दिसतो.आपला शत्रु चीन आपल्याला घेरण्यासाठी पुर्ण प्रयत्न करतो आहे.त्यांच्या राजधानीपासुन आपल्या सीमेपर्यंत लवकरात लवकर सैन्य घेउन येण्यासाठी महामार्ग बांधतो आहे.त्याचबरोबर आपल्या भागात घुसखोरी पण करतो आहे तरीही आपल्याकडे याबाबत फारच उदासीनता आहे.आपले सैन्य 'जो सर्वात उचापती करणारा शेजारी आहे(पाकीस्तान) त्याच्याविरुध्द जिंकण्याची आपली क्षमता असली पाहिजे' या थिअरीनुसार चालतो असे दिसुन येते.म्हणुनच चीनसारख्या देशाकडे दुर्लक्ष केले जाते. महाराज अशा विचारसरणिचे नव्हते असे वाटते.कारण तसे असते तर मुघल हे सर्वात महत्वाचे शत्रु होते आणि त्यांच्याकडे नौसेनाही नव्हती तरीही महाराजांनी नौसेना ,जलदुर्ग,उभारले.थोडक्यात म्हणजे आपले जे कोणी शत्रु विविध आघाड्यांवर आहेत त्यांच्याविरुध्द जिंकण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करण्याची महाराजांची पध्दत होती.
तर अशा शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण जन्मलो हे आपण आपले भाग्य मानले पाहीजे. पण एव्हढ्यावरच थांबुन उपयोग नाही.फक्त भावना,फक्त जयजयकार, फक्त मिरवणुका पुरेसे नाही. शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले गुण आपण आपल्यात अंगिकारण्याचा प्रयत्न केला पाहीजे. आपला समाज्,आपले राष्ट्र यांच्या भल्यासाठी आपण झटले पाहीजे. आपली शिवभक्ती फक्त भावना भडकवल्यावरच जागी होता कामा नये. शिवभक्ती आपल्या रक्ताचा भाग बनल्यावर भ्रष्टाचार्,नीतीमुल्यांचे हनन आपोआपच थांबेल.





आदिलशाही संघर्ष


              अफझलखान प्रकरण 
छत्रपती शिवाजी महाराज आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इ.स. १६५९ साली आदिलशहाने दरबारात छत्रपती  शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या अफझलखान नावाच्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफझलखान मोहिमेवर निघाला. अफझलखान वाईजवळ आला तेव्हा छत्रपती शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वर जवळ असलेल्या किल्ले प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पण छत्रपती  शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील यांनी ) अफझलखानाला गळ घालून किल्ले प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले. भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी निशस्त्र राहण्याचे ठरविण्यात आले .
छत्रपती शिवाजीराजांना अफझलखानच्या दगाबाजपणाची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधानी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे परिधान केली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती. शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा छत्रपती शिवरायांचा  विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता. प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी उंचपुर्‍या, बलदंड अफझलाखानने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे छत्रपती  शिवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि छत्रपती  शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण प्रचलित झाली.
आधीच ठरलेल्या इशार्‍याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्याची दाणादाण उडविली. खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपूनछपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. या ठिकाणी  खानाचा जनाना होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळून गेले.
छत्रपती शिवाजीराजांना जनतेत मिळालेला आदर आणि प्रेम अनेक शतकांनंतरही टिकून आहे त्यामागचे त्यांची सहिष्णू वृत्ती हे फार महत्त्वाचे कारण आहे. अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडावर बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.
अफझलखानच्या मृत्यूनंतर छत्रपती  शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापूरापर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा गड जिंकून घेतला. नेताजीने त्याच्या सैन्यासह जवळपास विजापुरापर्यंत धडक मारली.





माहिती संकलन – योगेश चौधरी


प्रसूती रजेचे नियम  GR - 

महिलांना बाळंतपणात मिळणाऱ्या भरपगारी रजेबाबत माहिती 

 




 
योगेश चौधरी

अर्जित रजे चे GR

                                        अर्जित रजा   GR

                          GR डाउनलोड  करण्यासाठी GR च्या नावावर click करा